Posts

Showing posts from June, 2020

लख लख चंदेरी तेजाची...

Image
                        लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया                     झळाळती कोटी ज्योतीया ssss  चित्रपट!! रुपेरी पडद्यावरची एक लखलखती, चमचमती दुनिया . चित्रपट हा समाजाचा आरसा असतो! असतो? की होता ?असो!!  भारतात आजतागायत दररोज कोट्यावधी प्रेक्षक चित्रपट बघतात.  गेली तीस वर्ष भारताचा चित्रपट निर्मितीत संख्येने पहिला क्रमांक आहे. जवळपास 110 देशात भारतीय चित्रपट दाखवले जातात. लाखो लोकांची ही उपजीविका आहे एवढंच कशाला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची ही एक भक्कम पायरीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  खरं पाहायला गेलं तर चित्रपट कला भारतीयांना पाश्चात्त्यांकडून मिळाली व भारतीयांनी स्वतःच्या तंत्रकुशलतेने तीला मोठी केली. पुरातन काळी भारतात छाया- नृत्याचे प्रयोग केले जाता. दिव्याच्या प्रकाशाच्या सहाय्याने मध्यभागी लावलेल्या पडद्यावर त्यांची हालचाल छाया स्वरूपात दिसे. चीन-जपान मध्येही हा प्रयोग अस्तित्वात होता पण आपल्याकडील छाया नृत्याल...

विज्ञानाच्या वाटेवर...!

Image
                 जय जवान !जय किसान !जय विज्ञान !  ही घोषणा म्हणजे भारताच्या प्रगतीचा मूलमंत्र आहे. जवान व किसान हे देशाचे दोन आधारस्तंभ आहेतच किसान पोटाची काळजी वाहतात ,तर जवान संरक्षणाची! भारताचे मा.जी पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या जय जवान! जय किसान !या उक्तीमध्ये जय विज्ञान! ही समर्पक भर घातली व त्यानुसार पोखरणच्या वाळवंटात कृतीही केली, आणि विज्ञान हा देखील भारताच्या प्रगतीचा एक आधारस्तंभ आहे हे सिद्ध केलं.  विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे .विज्ञानाने माणसाला चाकाचे रहस्य सांगितले, रथ, बैलगाडी ,आगगाडी, विमान अगदीच काय तर आता रॉकेटच्या सहाय्याने मानव अंतराळात चंद्रावर जाऊन पोचला. विज्ञानाच्या सहाय्याने अनेक खते संकरीत बी बियाणे आणि कृषी अवजारे शोधून त्याने कृषी उत्पादनातही प्रचंड क्रांती केली. विज्ञानाच्या सहाय्याने माणसाने आपले जीवनमानही वाढवले. असाध्य आजारांवर त्याने मात केली.एकूणच काय मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राला विज्ञानाने स्पर्श केला आहे. अनेक महान शा...

आम्ही सारे खवय्ये!

Image
चांद्यापासून बांद्यापर्यंत चा महाराष्ट्र विविधतेने नटलेला, निसर्गाने परिपूर्ण, भाषा मराठीचं पण तिथेही अनेक पैलू मालवणी ,वऱ्हाडी ,कोकणी. पण या सगळ्याबरोबर प्रकर्षाने आठवण होते ती फक्त पोटाला नाही तर "आत्म्याला तृप्त " करणाऱ्या मराठी पदार्थांची. खवय्यांसाठी म्हणजेच foodie बरं का ! तर foodie लोकांसाठी ही एक देणगीच ! आता या पदार्थांबद्दल काय बोलावं आणि  किती बोलावं आपल्याकडे म्हटलंच आहे की "माणसाच्या मनातला रस्ता त्याच्या पोटातून जातो "म्हणजे जेवण हे फक्त उदरभरणाचे काम करते असा समज कोणाचा क्वचितच होत असेल. नाश्त्याच्या पोह्या पासून परिपूर्ण, सुग्रास अनेक खाद्यपदार्थांनी नटलेले जेवणाचे ताट! प्रत्येकाबद्दल बोलावे तेवढे कमीच प्रत्येक सणावाराची स्पेशल डिश ठरलेली आणि ती एवढी परफेक्ट कधी कधी तर शंका येईल की ह्या डिशेस वरूनच सणवार ठरवले आहेत की काय !! अनेक पदार्थ हे प्रत्येक प्रांतात पिकणाऱ्या पिकावर अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येकाची चव वेगळी. बरं प्रत्येक पदार्थांचा background सुद्धा ठरलेला आहे जसं की भजी खाण्याचं स्वर्गसुख हे पाऊस पडत असतानाच घेता येतं आणि सो...

जयोस्तुते -The unsung part!

Image
    जयोस्तुते जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे ।      स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे। ओळी ऐकतानाच भान हरपून जाते. स्वातंत्र्य !!शब्दातच सारं काही आलं जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर ते स्वातंत्र्य! वर्षानुवर्षे इंग्रजांशी झगडल्यावर, शेकडो प्राणांच्या आहुती दिल्यावर , आपल्या स्वतंत्र भारताचा , आपल्या भारत मातेचा , राष्ट्रध्वज नभात फडकत असताना समस्त भारतीयांच्या अंगावर उठलेल्या रोमांच्याची , त्यांच्या डोळ्यांमधून वाहणाऱ्या आनंदाश्रूंची जाणीवच आपल्या आपल्याला स्वातंत्र्यवीर वि .दा. सावरकर त्यांच्या या गीतातून करून देतात. गीतामधलं यशोयुता वंदे यशोयुता वंदे हे वरच्या पट्टीत म्हणत असताना उर गलबलून येतो, भरून येतो आणि यातूनच प्रतिभावंत लेखनशैलीची पोचपावती मिळत असते .स्वातंत्र्यवीर "वि .दा .सावरकर" हे वकील होते थोर देशभक्त होते क्रांतिकारक होते त्याचबरोबर कवीही होते!  सावरकरांनी त्यांच्या महाविद्यालयात , रत्नागिरी व अंदमानच्या काळकोठडीत अनेक कविता  रचल्या.ज्यातील फारच थोड्या आपल्याला माहीत आहेत...

मराठी माणुस

Image
                            माझ्या मराठी मातीचा                               लावा ललाटास टिळा                              हीच्या संगाने जागल्या                            दर्‍या खोऱ्याततील शिळा कुसुमाग्रजांच्या ह्या ओळींनी उरअभिमानाने भरुन आला नाही तर तो नक्कीच मराठी माणूस असु शकत नाही. मराठी माणुस म्हटलं की डोळ्यासमोर द्रुश्य उभं राहतंतते मिळुन मिसळुन राहणारा चेहऱ्यावर नेहमी हास्य असणारा, सर्व सण उत्सव उत्साहाने साजरा करणारा पण स्वाभिमान दुखावला की चवताळून उठणारा , मोडेन पण वाकणार नाही असे समोरच्याला ठणकावून सांगणारा, आपल्या तत्वावर ठाम असणारा, असा हा मराठी माणुस !  वाद म्हटलं की तो चार हात लांबच असतो आणि उत्सवाच्या वेळी मात्र उत्साहाने ढोल पथकात सामील होतो. थोडक...